MPSC-UPSC सारख्या स्पर्धात्मक परीक्षांशी संबंधित अभ्यास साहित्य - प्रत्येक विषयाच्या महत्त्वाच्या नोट्स, मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका, सामान्य ज्ञान, नवीनतम चालू घडामोडी तसेच इतर उपयुक्त माहिती. Study related to MPSC-UPSC Excellent Qualitative Exams - Result notes of each subject, annual question papers, general knowledge, new current affairs and other useful.

Breaking

सोमवार, २८ मार्च, २०२२

Chalukya Dynasty UPSC - चालुक्य

♦️चालुक्य



*वाकाटकाच्या पतनानंतर भारताच्या पश्चिमी क्षेत्रात चालुक्य राजवंशाची स्थापना झाली, ता पूर्ण (पूर्व) क्षेत्रात  पाय राजसत्तेची स्थापना झाली.

*इ.स.५०० ते ७५० हा काळ दक्षिण भारताच्या इतिहासात चालुक्य श्चर्याचा इतिहास आहे.

*दोन्ही सत्ता कृष्णा-तुंगभद्रा दुआबावर कब्जा मिळविण्यासाठी संघर्ष करत होत्या. इ.स. १७५७ नेता हेच सत्र चास व सावनी चालुक्यांच्या संघर्षाचे कारण बनले.

 •बदामीचे चालुक्य

*यांच्या वंशाची माहिती देणारा सर्वाधिक महत्वपुर्ण स्त्रोत हा पुलकेशीन द्वितीयचा एहोळ अभिलेख आहे, लेखक विक्रिीन यामध्ये हर्षवर्धन आणि पुलकेशीन यांच्यामधील युद्धाचे वर्णन केले आहे.

*हे युध्द नर्मदा नदीकाठी लढले गेले. या वंशाचा हे संस्थापक पुलकेशी प्रथम होता. परंतु पुलकेशी द्वितीय हा महान शासक होता.

*पुलकेशी द्वितीय याने हर्षवर्धनवरील विजयानंतर परमेश्वर उपाधी धारण केली.

*याने कृष्णा-गोदावरीचा दुआब जिंकला व भाऊ विष्णुवर्धनाच्या अधिपत्याखाली बंगी चालुक्यवंशाची पायाभरणी केली. 

• पुलकेशीन द्धितीय :

*याने पल्लव शासक महेंद्रवर्मन प्रथमला पराजित केले.

*परंतु पल्लव नरेश नरसिंहवर्मन प्रथम याने पुलकेशीन द्वितीयचा पराभव करून बदामीवर पल्लवाचे वर्चस्व प्रस्थापित करत वातापीकोंड उपाधि धारण केली.

*पुलकेशीन द्वितीयच्या दरबारात व्हेनत्सांग (चीनी यात्री) आला होता.

• विक्रमादित्य प्रथम :

*याने नरसिंहवर्मन प्रथम (पल्लव) चा पराभव केला आणि कांचीची लुट केली.

 • विक्रमादित्य द्वितीय :

 यान पल्लव शासक नंदिवर्मा द्वितीयला पराभूत करून कांचीकोंड उपाधी धारण केली.

*विक्रमादित्य द्वितीय याने त्रिलोक महादेवी व लोकमहादेवी या हैह्य वंशांच्या राजकुमारीशी विवाह केला.

*या राजकुमारींनी क्रमश: त्रैलोकेश्वर मंदीर व लोकेश्वर मंदीर बनवले.

•वेंगीचे चालुक्य

*यांचे साम्राज्य कृष्णा गोदावरी दुआबात वेंगी (राजधानी) क्षेत्रात होते.

*ते बदामीच्या चालुक्याचेच वारसदार होते. शासक विष्णुवर्धन जो पुलकेशीन द्वितीयचा भाऊ होता.

*याचा संघर्ष राष्ट्रकुटाशी चालला पण शेवटी चोल साम्राज्यात विलय झाला.

 •कल्याणीचे चालुक्य : (इ.स. ९७३ पासून पुढे)

* स्त्रोत : बिल्हणचा विक्रमांकदेवचरित.

तैलप द्वितीय याने राष्ट्रकुट शासक कर्क द्वितीयचा पराभव करुन कल्याणीच्या चालक्य वंशाची स्थापना केली.

*याचा प्रसिध्द शासक विक्रमादित्य षष्ठम होता. याने शक सवंत बंद करुन विक्रम चालुक्य सवत (१०७६) चालू केले.

*याच्या दरबारात बिल्हण (विक्रमांकदेवचरित) व विज्ञानेश्वर (मिताक्षरा) हे दोन मंत्री होते.

 *अन्हिलगढचे चालुक्य (गुजरात)

*गुजरातच्या या चालुक्य शाखेचा संस्थापक मुलराज प्रथम (इ.स. ९४१ ते ९९५) होता याची राजधानी अन्हिलवाडा होती.

* भीम प्रथम : 

(इ.स. १०२१ ते १०६८) या शासकाच्या काळातच गजनीच्या मुहमदाने सोमनाथ मंदिरावर आक्रमण केले.नष्ट झालेल्या सोमनाथ मंदिराचे भीम प्रथमने पुनर्निमाण केले.

*भीम द्वितीय : 

याच्या काळात मुहमद घोरींचे आक्रमण झाले. घोचा गुलाम कुतुबुद्दीन ऐबकाने भीम द्वितीयचा पराभव केला.

नंतर येथील बघेल वंशाची जागा अल्लाउद्दीन खिलजींच्या आक्रमणाने सल्तनताने घेतली.

•चालुक्यकालीन कला 

• शिल्पकलेची चालुक्य शैली

*यात नागर व द्रविड या दोन्ही प्रकारच्या मंदिर शैलीचा संगम असल्यामुळे नवीनच अशी बेसर शैली उदयाला आली. यालाच चालुक्य शैली म्हणतात.

*चालुक्य शैलीत शिल्पकारांनी स्वत:ची शोधक कल्पना व प्रतिभेचा अफलातुन वापर केला आहे.

*मंदिराचे शिखर उंच व नक्षीदार आहे. स्तंभ गोल गुळगुळीत असून छत घुमटाकार आहे. छत व भिंतीवर सुरेख मुर्ती कोरल्या असून त्यांची प्रमाणबद्धता कमालीची आहे.

* बदामी, ऐहोळ, पट्टडकल हि चालुक्य शिल्पकलेची प्रमुख केंद्रे आहेत.

*काशी विश्वेश्वर मंदिर (लवकुंडी), सिद्धेश्वर मंदिर (हवेरी), मल्लिकार्जुन मंदिर (कुरुवट्टी) या प्रसिद्ध वास्तु चालुक्य शैलीची देण आहेत.

*याशिवाय गुहामंदिर, अखंड पहाड खोदून तयार केलेली बौद्ध विहारे (कर्नाटक) प्रसिद्ध आहेत.

•चालुक्यांची देणगी (ठेवा)

*मुळत: चालुक्य शासक वैदिक धर्माचे उपासक होते. त्यांनी आपल्या शासनकाळात अनेक वैदिक यज्ञ कले.

*परंतु हे राजे धर्म सहिष्णु होते. त्यांच्या राज्यात जैन व बौद्ध धर्मांनाही राजाश्रय लाभला.

*ऐहोळ शिलालेखकर्ता हा जैन पंडित होता. व्हेनत्सांग सांगतो कि, चालुक्याच्या राज्यात चार अशोकस्तंभ होते व इतरही अनेक स्तूप होते.

* वैदिक धर्मात- पौराणिक देवतांचे शिव व विष्णू यांचे  महत्व वाढले  होते.चालुक्यांनी अनेक शिव व वैष्णव  मंदिरे बांधली.

* ऐहोळचे लाडखान मंदिर, दुर्गा मंदिर व हुच्चिमल्लीगुडी मंदिरे प्रसिद्ध आहेत.

*लाडखान मंदिराची रचना चैत्यगुहेसारखी आहे. मंदिराचा सभामंडप सपाट छताचा आहे.

*प्रवेशद्वाराच्या खांबावर गंगा-यमुना कोरलेल्या आहेत. द्रविडशैलीची वैशिष्ट्ये येथे पाहता येतात.

*दुर्गामंदिरामध्ये गर्भगृह व सभामंडप यांच्यामध्ये अंतराल आहे.

*गर्भगृहावर शिखर आहे. हुच्चिमल्लीगुडी येथील मंदिरावर नागरशैलीचे शिखर आहे. इ.स. सातव्या शतकात प्रस्तरातून मंडप खोदण्याची पद्धत सुरू झाली.

*पट्टडकल येथे अशी दहा मंदिरे आहेत. त्यापैकी सहा द्रविड शैलीची आहेत. यातील विरूपाक्ष मंदिर प्रसिद्ध आहे.

*त्यात सभामंडपाच्या बाहेर स्वतंत्र नंदीमंडप आहे. व मंदिराच्या चहूबाजूस अंगण आहेत. मंदिरावर चौकोनी शिखर आहे.

*चालुक्य कलेची सर्वोत्कृष्ट देणगी म्हणजे पहाड खोदून तयार केलेली मंदिरे.

*अजिंठ्याच्या पहिल्या गुफेत दुसऱ्या पुलकेशीच्या दरबारात इराणी वकील नजराणा देतानाचे चित्रण आहे.

*अजिंठा गुहासमुदायातील काही चैत्यगृहे चालुक्य काळात खोदलेली आहेत.

*चालुक्य विक्रमादित्य दुसरा याच्या राणीने म्हणजे लोकमहादेवीने पट्टडकल येथे बांधलेले शिवमंदिर विरूपाक्ष मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे.

* यात गर्भगृह, अंतराल व अनेकस्तंभी सभामंडप आहे. सोळा अखंड खांबांवर सभामंडपावरील सपाट छत तोलून धरले गेले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा